महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मानांकन घसरले. यावेळी यादीत देखील नाव नाही
कृषी क्षेत्रात देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता कृषी शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी (एनआयआरएफ) च्या ताज्या मानांकनात राज्यातील एकाही कृषी विद्यापीठाला पहिल्या ४० संस्थांमध्ये स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी सातत्याने मानांकनात झळकणारे राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यंदा यादीतून पूर्णपणे बाहेर पडले आहे. ‘एनआयआरएफ’कडून दरवर्षी देशातील सर्वोत्तम ४० विद्यापीठांचीक्रमवारी जाहीर केली जाते. मात्र, यंदा महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेले नाही. राहुरीसह दापोली, परभणी, अकोला आणि नागपूर येथील कृषी व संलग्न विद्यापीठांचा समावेश नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘एनआयआरएफ’च्या मानांकनासाठी अध्यापनाचा दर्जा, संशोधनाची गुणवत्ता, नवोपक्रम, शेतकऱ्यांशी असलेला संपर्क, कृषी क्षेत्रातील योगदान, बायोटेक्नॉलॉजी, उद्यानविद्या, मत्स्यपालन, अन्नतंत्रज्ञान आणि कृषी उद्योगातील कामगिरी अशा विविध निकषांचा विचार केला जातो. राज्यातील कृषी शिक्षणाची धुरा सांभाळणाऱ्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ. पंजाबरावदेशमुख कृषी विद्यापीठ तसेच महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या संस्थांना केंद्र आणि राज्य सरकारकडून सातत्याने आर्थिक मदत मिळत असतानाही राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता टिकवण्यात अपयश आले आहे. राहुरी कृषी विद्यापीठ विद्यापीठात ६० ते ७० टक्क्यांहून अधिक प्राध्यापक व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अध्यापन, संशोधन आणि विस्तारशिक्षणावर मोठा परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कृषिशिक्षणाकडे झालेले सातत्यपूर्ण दुर्लक्ष, संशोधनासाठी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था, धोरणात्मक अनास्था आणि पदभरतीतील विलंब यांमुळे अधोगती वेगाने होत आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणाऱ्या संशोधन, नवतंत्रज्ञान व कृषी विकासावर होत भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे
यापूर्वी ३७वा क्रमांक; आता नावही नाही 66 विद्यापीठाचा पूर्वी एनआयआरएफमध्ये ३७वा क्रमांक होता. सध्या ७० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्यामुळे गुणवत्ता राखणे कठीण झाल लवकरात लवकर पदभरती होणे आवश्यक आहे. शेतकरी आणि पालकांकडून अभिप्रायही मानांकनात महत्त्वाचा निकष असतो. एनआयआरएफची समिती प्रत्य विद्यापीठांना भेट देऊन पाहणी करणार आहे.असे
डॉ. साताप्पा खरबडे, अधिष्ठाता (कृषी) व संचालक शिक्षण, राहुरी विद्यापीठ यांनी सांगितले आहे विद्यापीठाची क्रमवारी घरसण्याची प्रमुख कारणे कृषि ७० टक्क्यांहूनअधिक पदे संशोधन आणि
नवोपक्रमाच मंदावलेला वेग कृषी शिक्षणाकडे धोरणात्मक विस्तार शिक्षण व शेतकरी संपर्कात घट गुणवत्तावाढीसाठी आवश्यव मनुष्यबळाचा अभाव अशी अनेक कारणे आहेत.
विद्यापीठ प्रतिनिधी. आर.आर.जाधव न्युज फोर्टिन राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




